Friday, September 4, 2009

धर्मंवेड

मला या गोष्टीची नेहमीच ख़त राहिली आहे की मला मी जन्मलेल्या धर्माबद्दल पुरेशी माहीती नाही। धर्म हा शब्द ऐकल्यावर आपण सगले एकदमच नकळतच sensitive होउन जातो, आणी त्याला आपल्या धर्माला असलेला प्राचीन इतिहास जवाबदार आहे। लहानपणी झोपताना आई-वडीलानी ऐकव्लेल्या पौराणिक कथा तुमच्या पैकी कितीना बरोबर आठवतात....??? मला तर त्या आठवताना जराशी पंचाइतच होते . नेहमी भीती ही असते की मी कुठल्या दोन कथा एकत्र तर करत नाहीये ना.....????
पौराणिक कथे बदल माझ्या मनात नेहमीच उत्सुकता कमी आणी शंकाच जास्त राहिल्या आहेत....कधी कधी अस वाटत की शेकडो वर्षं पासून सांगन्यात येणार्या कथा आपल्या पीढी पर्यंत येताना कदाचित manipulate तर झाल्या नसतील ना? म्हणजे कुठल्या माणसाला डोक असत ( माझ्या बद्दल लोकाना त्याबद्दल सुद्धा संशय आहे.....??? जाऊ दे उगीच त्यावर इथे clarification द्यायची गरज नाही) कारण ही निसर्गाची देणगी आहे, आणी त्यामुले रावणाला १० डोके होते हे जे बोलला जाता यावर जो पर्यंत मला कोणी काही पुरावा देत नाही तो पर्यंत मला त्यावर विश्वास बसना थोड़ा अवघडच आहे। अहो जिथे कुठल्याही देवाला एक पेक्षा जास्त डोक असल्याचा पुरावा नाहीये तिथे रावणासारख्या दानवाला परमेश्वर आणी निसर्ग १० डोके कसे काय दिल...?? ही एक आख्यायिका का असू शकत नाही.....????? मला पौराणिक कथा सांगायला आक्षेप नाहीये पण त्या सांगताना त्यांच्या वर नीट अभ्यास करून सांगायला हव्या हे माझा स्पष्ट मत आहे।
हिंदू धर्म किती श्रेष्ट आहे आणी इतर धर्म किती नीच आहेत हे मला ठरवायचा काहीही हक्क नाहिये, मला काय पण कोणालाच हा हक्क नाहीये। स्वदेस मध्ये खुप सुंदर वाक्य आहे जेव्हा मोहन गावातल्या लोकाना म्हणतो की," मुझे नाही लगता की मेरा देश दुनिया का सबसे महान देश हैं" त्याच प्रमाणे मीही म्हणेल की मला नाही वाटत की माझा धर्म सगळ्यात श्रेष्ट धर्म आहे। ज्या धर्म मध्ये अजूनही ब्राम्हण-दलित अस भेदभाव केला जातो, तो धर्म मुळआत श्रेष्ट कसा काय होऊ शकतो??
मी आज पर्यंत कुठलीही धार्मिक कादंबरी वाचलेली नाहीये पण मला या गोष्टीचा ठाम विश्वास आहे की कुठल्याच कादंबरी मध्ये लोकांमध्ये त्यांच्या जातिवारून discriminate करा अशी शिकवण कुठल्याच ग्रंथ अथवा कादंबरी मध्ये नसेल, आणी जर अशी कुठली शिकवण असेल तर तिचा पुरस्कार केल्यास कुठल्या प्रकारे हिंदू धर्माचा नुकसान होइल अस मला बिल्कुल वाटत नाही। मला नेहमीच हे वाटत राहिला आहे की कुठलाही धर्मा का असेना त्याच्या निर्मिती मागील मुख्या कारण म्हणजे त्याला मानणारे लोक हे एकत्रित रहावे आणी संघटित रहावे हेच उधिष्ट असत पण जर अपन सध्याची हिंदू धर्मा ची परिस्थिति पहिली तर मला हे बिल्कुल वाटत नाही की आपण एकत्रित आहोत किंवा संघटित आहोत।
मला हे logic पटत की हाताची पाच बोट एक सारखी नसतात पण याचा अर्थ आपण नेहमीच स्वभावगुण सोडून फक्त एकमेकाची जातच पहावी का? मला हे सुद्धा पटत जेव्हा लोक म्हणतात की फक्त हिंदू धर्मा मध्ये थोडी problems आहेत, Christians, Islam मध्ये सुद्धा Discrimination केला जात, पण त्यांचा धर्मा ठीक नाही म्हणुन आपण कसही वागलेल कुठल्याही प्रकारे justify होत नाही।
चलो then, I guess आज funda जरा जास्तच झाला। येत्या काळात VISA येइल अशी अपेक्षा आहे आणी एकदा UK ला गेलो की मग तिथले अनुभव एकदम मजेदार प्रकारे सांगेन हे माझ तुम्हाला एकदम फुल promise आता निरोप घेतो टा-टा..!!!

Sunday, August 2, 2009

शिकाऊ लेखकाची व्यथा

बर्याच दिवसं पासून काही तरी लिहाव असा विचार करतोय। एक-दोन टॉपिक सुद्धा मानत होते पण जेव्हा ते टॉपिक Elaborate करायची वेळ आली तेव्हा पुरेसे points नाहीयेत याची जाणीव झाली। माझ्या अनेक post मध्ये असच झालेल आहे की माझ्याकड़े मुळ कल्पना होती पण तिला बसे ठेवून तिच्यासंदर्भात मुद्द्यांची कमतरता होती। मग अशा पोस्ट च्या शेवटी मग वाचक तू अजुन चांगला लिही....याला नीट अजुन चांगल करता आल तर बघ...अशी प्रतिक्रया देतात।
तुमच्या सोबत सुद्धा अस होत असेल ना की बर्याच वेल्स काहीतरी करावा अशी इच्छा असते पण त्यासाठी ज्या मुद्द्यांची अथवा त्या Elements ची आवश्यकता असते तेच नेमके आपल्या जवळ नसतात। कधी काही लिहायची इच्छा होत असते आणी आपण सुरुवात सुद्धा करतो पण जेव्हा मांडायची वेळ येते तेव्हा ठरवलेला आणी प्रत्यक्षात झालेला लेखन या मध्ये फरक जाणवतो। पण फक्त लेखनच नव्हे तर अशा अनेक गोष्टी असतात जेव्हा आपण थोड्या घाईगडबडी मध्ये काही निर्णय घेतो आणी नंतरच्या निकालाची वाट पाहत नाही।
अनेकदा अनेक गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. जर नशीब आपल्या बाजूने असेल तर ठीक नही तर पश्चाताप शिवाय हातामध्ये कही उरत नाही. For Example:- बाजारात नविन मोबाईल दाखल झालेला असतो। सर्वसामान्य खरेदी करणारा चार जाणकार लोकांशी बोलतो त्याना त्या मोबाईल संदर्भात माहीती विचारतो आणी सगल्यानी होकार दिल्यावर तो मोबाईल विकत घेतो। पण कधी कधी आपण आपल्या Gut feeling च ऐकतो आणी खरेदी करतो आणी Coincidently तो मोबाईल चांगला सुद्धा निघतो । पण याचा अर्थ proper planning करून काही खरेदी करू नए असा बिल्कुल होत नाही कारण नशीब नेहमीच तुमच्या बाजूने कॉल दिल अस गरजेचा नाहीये।
मी नेहमीच ब्लॉग कार काही पोस्ट करताना जाम confuse असतो। या confusion ला अनेक कारण आहेत, म्हणजे अनेकदा आपल्याला अशा गोष्टी करायच्या असतात ज्या करण्यासाठी ती वेळ बिल्कुल योग्य नसते पण still आपण त्या करतो कारण आलेल्या Gut feeling खुप positive असते । For Example:- एखाद्या आवडनार्या मुलीला फ़ोन करायची मनात खुप इच्छा असते, problem अस असतो की आपल्या कड़े तिच्याशी बोलायला काहीही मुद्दा नसतो पण फक्त तिच्याशी बोलायचा असता मग अशावेळेस Normal मुल दोन पैकी एक गोष्ट करतात एक तर मनाची समजूत घालतात की उद्या फ़ोन करूया म्हणजे रात्र भरा मध्ये काहीतरी टॉपिक ठरवायला वेळ तर मिळेल। किंवा काही धाडसी मूल असतात जे अस विचार करतात की एकदा फ़ोन तिने उचलला की मग ठरवुया की काय बोलायचा आहे ते।
तुम्हाला वरील उदाहरण द्यायचा कारण अस की माझ ब्लॉगच्या बाबतितला धोरण हे दुसर्या प्रकारचा आहे। मी सुरुवात करतो आणी शेवटी हेच विसरून जातो की मला नेमका सांगायचा काय आहे। Of course माझा लेखन gradually improve होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा थोडासा Impatient स्वभाव मला काही केल्या स्वस्त बसु देत नाही।
You know something, माझ्या मनामध्ये लेखकानबद्दल पूर्वी फार आदर नव्हतामला वाटायचा की फक्त भाषेवरील प्रभुत्व या लोकाना यशस्वी ठेवून आहेस्वतःच्या अथवा माहितीतल्या लोकांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या एखाद्या प्रसंगावरून प्रेरित होउन त्याला चांगल्या भाषेची सांगड़ घालून हे लोक आपल्यासमोर एक पुस्तक ठेवायचे असा माझा फार चुकीचा समज होता परन्तु जेव्हा मी स्वतः कागद-पेन हातात घेतला (I am talking metaphorically here) तेव्हा त्यांच्या श्रेष्ठत्वाची मला जाणीव झाली