Wednesday, September 23, 2009

नात्याची गुम्फण...!!!

आपल्या आयुष्याचा आणी त्यामध्ये आपल्याला मिणार्या नात्याचा आपलाच सूत्र असता। अनेक नाती तयार तर लगेच होतात पण त्याची योग्य घड़ी बसायला काही वर्ष तर कधी कधी दशक लागतात। कधी कधी काही नात्याना योग्य घड़ी बसायला वर्ष सोडाच पण काही दिवस सुद्धा खुप होतात। आज मी २१ वर्षाचा आहे, एक दृष्टिकोनातून बघाल तर फार तरुण वाटेल तुम्हाला मी, कदाचित तुमच्यापैकी बर्याच जणाना वाटेल की एवढ्या कमी वयात मला नात्यांच महत्व नसेल, पण कोणतीही गोष्ट एकतर्फी विचार करून बघू नये। माझा सोडाच पण तुम्ही स्वतः २ मिनिट डोळे बंद करून जन्मा झाल्या पासून आज पर्यंतच्या कमाव्लेल्या नातेवैकांची उजणी करून बघा तूम्हाला मी सांगत असलेला मुद्दा पटेल ।

माणसाजवळ भरपूर नाते झाले तर त्याची लोकाना analyse करायची शक्ति बोथट होते, तो सर्वाना एकच तराजू मध्ये मोजायला लागतो या गोष्टीचा विचारही नकरता की आपण घ्राह्या धरलेले लोक अथवा नाते खरच आपले आहेत किंवा नाहीयेत। कस असता की आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या बाजूने होतील अशी शाश्वती परमेश्वर सुद्धा देत नसतो, त्यामुले नेहमीच परमेश्वर वाईट परिस्थिति मध्ये आपल्या बाजूने उभा राहिल हे गरजेचे नसते, कधी कधी तो आपली परीक्षा घेण्यासाठी परमेश्वर विरोधी पक्षा सोबत असू शकतो। अशा परिस्थिति मध्ये आपण आपल्या आयुष्य मध्ये काय कमावला आणी काय गमावला या base वरून आपल्या आयुष्याचा कल ठरत असतो। जर आपण आपल्या आयुष्यामध्ये चार चांगले मित्रा जरी कमावले असतील तरी आपल्याला त्यांचा खुप फायदा होत असतो। वाईट परिस्थिति मध्ये उपयोग करण्यासाठी आपण नाते जपावे अस मी म्हणत नाहिये पण जर वाईट परिस्थिति मध्ये उपयोगी येणार नसतील ते नाते आणी तसले नातेवैक काय उपयोगाचे।

माझा वय कमी जरी असला तरी या कमी वयामध्ये मी आयुष्याचा अनेक चेहरे पाहिले आहेत, लहानपणी एक हसरा चेहरा पाहिला आहे, तारुण्याचा उम्बरठा आला तेव्हा आयुष्य जगण्यासाठी झालेली मनाची आणी धनाची झालेली घालमेल सुद्धा खुप जवलून पहिली आहे मी। आयुष्य दिसता तितका सोपा नाहीये हे मला समजावन्यासाठी मी एक प्रकारे परमेश्वराचा व्रुणीच आहे। पण आज गेल्या काही वर्षां पासून सुरु असलेल हे वादजरी मोठ्या प्रमाणावर शमलेल असला तरी आज मागे वलून बघताना बराच काही बोधपर वाटतय मला। या
काळमध्ये खुप जवची नाती गमावली सुद्धा आहेत आणी खुप दूरची नविन नाती कमावली सुद्धा आहे।

नात्यांचा आणी आयुष्याचा थोड़ा किचकट असता, आपल्याला कधी कधी अवलोकन करताना अनेक वेळेस बालपण गेल याच दुख असता पण तारुण्य आल याचा आनंद असतो त्याच प्रमाणे जुन्या नाती दुरावली याचा क्लेश असतो आणी नविन नाती मिळाली याचा आनंद सुद्धा असतो, यातला आपल्याला क्लेश हवा आहे की आनंद हे आपण ठरवायचा असता। शेवटी काय तर जून काय आणी नविन काय नात्यांची गुम्फण करता यायला हवी...!!!!

5 comments:

पराग मोराणकर said...

छानच लिहिले आहेस... खरच खूप सही वाटले वाचतांना.............
This is one one of your best composition I can refer......

Prajakta said...

hi apratim lihila ahes re,khara ahe junya tutlelya natyanmadhe adkun n rahanyapeksha navin milnarya natyanchya anand upbhogava.......barober ahe.

avdala jaam mala ha vishay

Anonymous said...

mast lihila ahes re,......i like it....progressing a lot

Shantanu said...

Nice one. Its gud, you are heading towards maturiry.

Unknown said...

Awesome dude ....kharac khup chan lihiley ...aaj kharac asa watey ki tu khp mottha zala ahes ..ani ho samajdar suddha ...Good keep up the spirit ...asa c chan chan lihi ...